दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार! : मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंच्या विधानाने खळबळ 

अमरावती : बशावृत्त

देशाला भेडसावणार्‍या समस्यांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरएसएस प्रणित अतिरेकी संघटना वा व्यक्‍ती कायम वादग्रस्त विधानं करत असतात. मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी महात्मा गांधी यांचे वडीलच बदलण्याचे धाडस करताना त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अजूनही मनोहर कुलकर्णी मोकाट कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत’, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंनी अमरावतीत एका कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडेच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही संभाजी भिडेंनी केला.

देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच. अशा प्रकारचा उपदेश देणार्‍या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करा. हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे; परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदार्‍या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढार्‍यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी (28 जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेच्या अटकेची मागणी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणार्‍या व्यक्तीला कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत.

राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम 153 अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी. तर, याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे एकनाथ शिंदे यांनी आश्‍वासन दिले आहे.

अनुसूचित जाती-जमातींचे बनावट जात प्रमाणपत्र काढून नोकर्‍या बळकावणार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी उत्तराखंड विधान सभेवरील तरुणांचा नग्‍न मोर्चा, देशाची मान खाली घालायला लावणारी मणिपुरातील महिलांची नग्‍न धिंड, खनिज संपत्तीवर डोळा ठेवून सरकार पुरस्कृत भांडवली हिंसाचार, केंद्रातील भाजप सरकारवर विरोधी पक्षांनी आणलेला अविश्‍वास ठराव, यावरून भाजपचे पितृसत्ताक हिंसात्मक चरित्र उघडे पडले आहे. या घटनांवरून लक्ष विचलित करण्यासाठी मनोहर कुलकर्णीने हा डाव खेळला असावा, असा कयास आहे.

नेहमीच वादग्रस्त विधानं करून समाजात दुही निर्माण करणार्‍या मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंना सरकार कधी अटक करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?