दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे...



बंडखोर ‘राम’ : मुलं कोल्हाट्याचं पोर म्हणून हिणवायचे...


प्रा. डॉ. राम आशाबाई ठाकर या मित्राविषयी भावना व्यक्‍त करणारे हे सदर बहुजन शासक मीडियाच्या वाचकांसाठी


भास्कर सरोदे :

‘कोल्हाट्याचे पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे हे मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात आले होते. राममुळेच डॉ. काळे दोन दिवस वसतिगृहात मुक्‍कामी राहिले. यावेळी ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. त्यांच्याबरोबर मला गप्पा मारण्याचा योग राममुळे आला.

या चळवळीत राम कसा? हा प्रश्‍न अनेकांचा असायचा. काहीजण टोमणेही मारायचे. त्या टोमण्यांनी राम अनेकदा घायाळ व्हायचा! कोलमडून पडायचा!! आई संगीतबारीत असणं आणि कोल्हाटीण असणं यातला फरकच लोकांना वा विद्यार्थ्यांना समजायचा नाही.

खरं तर थट्टामस्करीचा हा विषय नव्हताच, पण असंवेदनशील मुलांना कोण सांगणार? माणसाचा जन्म कोठे व्हावा, हे त्याच्या हातात नसतेच मुळी. तथापि, जातिव्यवस्थेची मुळं समाजमनावर इतकी खोलवर रूजली आहेत की, ती आपल्या जाणिवेतून आणि नेणिवेतून प्रकट होत असते. रामचा विषय तर त्यापलीकडचा होता.

राम हारणारा नव्हताच, तो लढणारा होता, मार्ग काढणारा होता.

एके दिवशी तो माझ्या रूममध्ये आला अन् म्हणाला, ‘सरोदे, मला तुझ्या रूममध्ये राहायचे...’

मी म्हटले का?

‘काही मुलं मला चिडवतात, डिवचतात, त्यांच्या तोंडी लागलो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल....’

माझ्यासोबत राहिल्याने ते तसे करणार नाहीत, असा रामचा अंदाज होता, हे मी हेरले होते. रामला होणारा त्रास अनाकलनीय होता. मात्र, त्याविषयीची पुसटशी कल्पना आम्हा दोघांमधील कॉमन मित्र राजेश पंडितने DIG, भुवनेश्‍वर, ओडिसा. सध्या अमेरिकेतील MIT मध्ये प्रशिक्षणला आहे) मला दिली होती. आणि जो मुलगा रामला नेहमी टोमणे मारायचा, त्याचा संत तुकाराम मुलांचे शासकीय वसतिगृहाला प्रवेशच माझ्या विनंतीवरून आदरणीय चौधरी सरांनी केलेला होता. असं म्हणतात आता तो फार श्रीमंत झालाय आणि हो, मला तर तो केव्हाच विसरलाय. त्याचे नाव घेण्याची गरज वाटत नाही इतका तो ‘मोठा’ झालाय.

राम आणि मी सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे विद्यार्थी. हा आमच्यामध्ये एकसमान धागा असला तरी औरंगाबादला मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहात आल्यावरच आमची खरी ओळख झाली. यामुळेही मला त्याची सहानुभूती वाटली. 

मी होकर दिला...

आणि झालेही तसंच, रामची पुढील दोन वर्षे नको वाटणार्‍या त्रासाविना गेली.

मी आणि संभाजी बुक्‍तरेंसोबत राम खूपच मिळूनमिसळून राहिला. अनेकदा आनंदून हसला, फुलला, बहरला...

त्याला चुकूनही ‘त्या’ टोमण्याची जाणीव अथवा आठवण आम्ही होऊ दिली नाही...

आपल्या नावासोबत आईचे नाव लावून रामने या पुरुषी व्यवस्थेच्या विरोधात बंडच पुकारले होते. अनेकांना ते विचित्र वाटायचे. मात्र, राम आपल्या निर्णयावर ठाम होता. बापाच्या नावाविना कर्तृत्व गाजविता येते, हेच रामला दाखवून द्यायचे होते. शिवाय भारत मातृसत्ताक कालखंडात समतामूलक होता, हाही संदेश त्याला त्यातून द्यायचा होता. पुरुषसत्ताक व्यवस्था विषमतावादी आहे, असे त्याला म्हणायचं होतं. मातृसत्ताक पद्धती भिल्‍ल आदिवासींमध्ये आजही कार्यरत आहे. एका स्त्रीचा आदर-सन्मान करणारा हा राम आहे. असे धाडस येर्‍या गबाळ्याचे काम नाही...असे करायला वाघाचे काळीज लागते, जे रामकडे आहे!

राम बीई मेकॅनिकल पास होणारा भिल्‍ल आदिवासी आणि नाच गाण्याची पार्श्‍वभूमी असलेल्या समाजातून आलेला मराठवाड्यातील पहिला विद्यार्थी!

आज तो प्राध्यापक व संचालक, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्र आणि प्रभारी  नियोजन अधिकारी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे कार्यरत आहे. त्याने IIT  मद्रास सारख्या नामवंत संस्थेतून M.Tech.  केले आहे. 

तमाशा कलावंतांसाठी डॉ. किशोर काळेंसोबत काम, आदिवासी समाज, बहुजन चळवळ, आदिवासी चळवळीत सहभाग, 2005 पासून F­ASA ­(Phule Shahu ­Ambedkar Student ­Association advisor ), बामसेफ, मालेगांव व भिवंडीतील 4500 यंत्रमाग कामगारांसाठी काम व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न, विद्यापीठातील शैक्षणिक सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि तो स्तंभलेखक असून त्याच्या तीन पुस्तकांचे लेखन पूर्णत्वास आले आहे.

असा हा हुरहुन्नरी राम मिलिंद मुलांचे शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी आहे, ही निश्‍चितच अभिमानाची बाब आहे.

तात्पर्य : विपरीत परिस्थितीचा सामना केला पाहिजे, विजय निश्‍चित आहे.

Save Journalism!, Save Democracy!!

DONATE...

BAHUJAN SHASAK MEDIA

(निर्भिड आणि परखड बातम्या आणि विश्‍लेषणासाठी ‘बहुजन शासकनियमित वाचा) 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लढा प्रतिनिधित्वाचा... : अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचा संवाद प्रारंभ

उघडलाच नाही काळ्यारामाचा दरवाजा!

प्रेक्षकांनी फिरवली पाठ; संमेलने निरूपयोगी ठरलीत काय?