पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी!

इमेज
  दत्तक बालकाची जन्मापासून ते मरणापर्यंत शोकात्मक कहाणी! सत्यशोधक चरित्रकार राजाराम सूर्यवंशी लिखित डॉक्टर यशवंतराव जोतीराव फुले  यांचे चरित्र, नाग-नालंदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. डॉक्टर यशवंतराव फुले यांचे हे सविस्तर पहिले वहिले चरित्र प्रकाशित झाले याचा संबंध महाराष्ट्रीयन जनतेस अभिमान असला पाहिजे.  बोलकी अर्पण पत्रिका : ‘अवघे पाच दिवसांची अभ्रक सावित्रीबाईंच्या पदरात टाकणार्‍या (यशवंताच्या दृष्टीने) अज्ञात माता काशीबाई आणि ज्ञात माता सावित्रीबाई यांना अर्पण...’ किती बोलकी आहे पहा. निपुत्रिक असलेल्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेल्या या बालकाची कहाणी जन्मापासून तर अखेर मरणापर्यंत किती शोकात्मक आहे याचा वेध या चरित्रात अत्यंत संवेदनशील मनाच्या राजाराम सूर्यवंशी यांनी घेतला आहे. गेल्या 25 वर्षांच्या संशोधन कार्याचा हा परिणाम आहे. संशोधन मनन, चिंतन करून अपार कष्ट घेऊन प्रस्तुत चरित्र ग्रंथ लेखकांनी पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभारही मानतो. भावंडांनी फुले दाम्पत्याशी तोडले संबंध : जन्मदात्री अभागी माता काशीबाईंचा ठावठिकाणा शोधाय...

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar

Waiting for a Visa : Autobiography of B. R. Ambedkar
Buy online at amazon

मनुस्मृती दहन दिन: महात्मा जोतीराव फुलेंची भविष्यवाणी 70 वर्षात ठरली खरी!

इमेज
मनुस्मृती दहन  दिन: महात्मा जोतीराव फुलेंची भविष्यवाणी 70 वर्षात ठरली खरी! -महात्मा फुले लिखित ‘निर्मिकाचा शोध’ आणि ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ प्रकाशनाच्या वाटेवर बहुजन शासक : बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे जाहीर दहन करून देशातील सुमारे 80 टक्के (100 टक्के स्त्रियांसह) जनतेला विषमतावादी, गुलामगिरीतून मूक्‍त केले. तेव्हापासून महाराष्ट्र आणि देशात 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. या दिनाची यानिमित्ताने आठवण होण्याचे कारण असे की, मनुस्मृती दहन करण्याची भविष्यवाणी महात्मा जोतीराव फुले यांनी केली होती. आणि सुमारे 70 वर्षातच बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मनुस्मृती जाहीर जाळली. हा काही योगायोग म्हणता येणार नाही. तर एका शिष्याने आपल्या गुरूला दिलेली एक अनमोल भेट म्हणता येईल. याशिवाय भारताला संविधान देऊन कायद्याने मनुस्मृतीला स्पष्ट धिक्‍कारले आहे. महात्मा फुलेंची भविष्यवाणी! : महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरांवर कठोर आसूड ओढले आहेत. शिक्षणातील विषमता, देव आणि धर्माच्या नावाने होणारी शेतकर्‍या...

स्त्री-पुरुष समता : भाजप सरकारसाठी पेरियार पथदर्शी!

इमेज
 स्त्री-पुरुष समता : भाजप सरकारसाठी पेरियार पथदर्शी!    देशात बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात येऊन 13 वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह होणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सर्वाधिक बालविवाह होणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिल्या पाच राज्यांमध्ये समावेश आहे. मुलींवरील वाढते अत्याचार आणि त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असुरक्षितेतची भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. या पार्श्‍वभूमिवर मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिले. या निर्णयाचे संमिश्र स्वागत झाले. तथापि, असाच विचार पेरियार रामासामी यांनी 100 वर्षापूर्वी मांडला होता. पेरियार यांचा विचार किती दूरदृष्टीचा होता, हे आज लक्षात येते. मुला-मुलींच्या समतेच्या बाबत भारत सरकार 100 वर्षे मागासलेले असल्याचे लक्षात येते. पेरियार रामासामी यांचा 24 डिसेंबर रोजी स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने ‘पेरियार स्त्रियांच्या मूलभूत हक्‍कांचे खंबीर समर्थक’, यावर प्रकाश टाकणारा लेख प्रसिद्ध लेखक भीमराव सरवदे यांनी खास बहुजन शासकसाठी...

‘जिल्हा परिषद शाळेतील मुलं तहानलेली आणि उत्तम दर्जाचे शिक्षक’

इमेज
 ‘जिल्हा परिषद शाळेतील मुलं तहानलेली आणि उत्तम दर्जाचे शिक्षक’ शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद आयोजित काव्यसंग्रहाचे प्रकाशन, महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि कविसंमेलन उत्साहात जिजाऊ मंदिर : उद्घाटनीय विचार मांडताना ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, विचारमंचावर डावीकडून प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, ज्येष्ठ साहित्यिक गेणू शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लीला शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, कृषिसत्न विश्‍वनाथ चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्‍ता प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, अर्थतज्ज्ञ डॉ. डी. एस. काटे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, आदी. अमिता सरोदे, औरंगाबाद : आज शिक्षणाचे खासगीकरण, भांडवलीकरण आणि कॉर्पोरेटीकरण सुरू आहे. सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी शाळा मरणपंथाला टेकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय शाळा उभारणारा, राष्ट्रपती पुरस्कार विजेता उपक्रमशील आणि कृतिशील वाबळेवाडीचा दत्तात्रय वारे हा शिक्षक निलंबीत होतो. अशा परिस्थितीत सरकारी शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता मैलाचा दगड ठरली आहे, असे विधान धाडसाचे होईल. आणि हे धाडस ‘आनंदाचे झाड’ या कथेच्या ...

शिक्षक, पालक, विद्यार्थी असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे

इमेज
शिक्षक, पालक, विद्यार्थी असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे -सामान्य असल्याचे किंचितही मनात आणू नका; मुख्याध्यापकास लिहिलेल्या पत्रात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आवाहन बहुजन शासक मीडिया, (शुक्रवार, दि. 17 डिसेंबर 2021) : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारच्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह 12 असामान्य वीरयौद्ध्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्यदलातील ते सर्वजण असामान्य होते. या अपघातात एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बंगळुरूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी असामान्य झुंज देत बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्याबाबतीत मृत्यू जिंकला, झुंज हारली, एवढेच म्हणावे लागेल. असे असले तरी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास संदेश मागे ठेवला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी जीवनाच्या अनेक कठीण पायर्‍या यशस्वीपणे चढल्या आहेत. त्यांची चित्तथरारक जीवनगाथा प्रेरणेचा स्त्रोत आहे. मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात वरुण सिंह म्हणतात, ‘बारावी बोर्डच्या गुणांवरून कुणाचे मूल्यमापन करू नका…मी, खेळ व अभ्यास...

राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीओंके पाप धोते धोते!

इमेज
 राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीओंके पाप धोते धोते! - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गंगास्नान चर्चेचा विषय 2014 ला प्रथम सत्तेवर येताच ‘नमामि गंगे’ योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. सर्वांनी स्वागत केले! मात्र, गंगा शुद्धीकरण करता करता प्रधानमंत्री मोदी यांना स्वत:चेच शुद्धीकरण करून घ्यावे लागत आहे, हे कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवार, दि. 13 डिसेंबर 2021 रोजी वाराणशी-काशीचा कायापालट करणार्‍या योजनांचा शुभारंभ केला. त्यानंतर गंगास्नान केले. प्रधानमंत्री मोदींच्या गंगास्नानाचे विविध अर्थ मीडियातून प्रतिबिंबित झाले. सोशल मीडियाही अपवाद नाही. सोशल मीडियात प्रधानमंत्री गंगास्नान करतानाचा व्हिडीओ व्हायरल करताना ‘राम तेरी गंगा मैली हो गयी…पापीयोंके पाप धोते धोते…’चा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियाची स्वतंत्र नजर असून आजमितिला स्वतंत्र अस्तित्व आहे. सोशल मीडियाच्या या ट्रेंडचा बहुजन शासक मीडियाने वेध घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘पापी’ कारकीर्दीचा चित्रमय धांडोळा घेतला आहे.  1....

राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू?

इमेज
  राहुल गांधी कोणत्या अर्थाने हिंदू ? काँग्रेसची हिंदू-हिंदुत्ववादी नवव्याख्या काय अधोरेखांकीत करते? काँग्रेस नेते राहुल गांधी यांची वंशावळी तपासली तर लख्ख आरशासारखे राहुल कोण आहेत, हे स्पष्ट होते. राहुल गांधी यांची आजी (जास्त खोलात न जाता) स्व. इंदिरा गांधी आणि आजा फिरोज  या नात्याने राजीव गांधी (गांधी हे नाव धारण केलेले आहे) आणि सोनिया ऊर्फ अंतोनियो अल्वीना माइनो (ख्रिश्‍चन) या दोघांचे चिरंजीव असलेले राहुल गांधी कोणत्या नात्याने हिंदू आहेत?, हे वाचकांवर सोडले तर काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचा प्रश्‍न उरतोच... -संपादक कालचे राहुल गांधींचे जयपूर राजस्थान मधील हिंदू कोण आणि हिंदुत्ववादी कोण? या संबंधीचे भाषण देशवाशियांनी ऐकले आणि अनेक धर्मनिरपेक्षवादी, लोकशाहीवाद्यांच्या आणि समाजवाद्यांच्या भुवया उंचावल्या.   या देशावर काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्षे 286 दिवस, इंदिरा गांधींनी 11 वर्षे 59 दिवस, डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे 4 दिवस, राजीव गांधींनी 5 वर्षे 32 दिवस, नरसिंहराव यांनी 4 वर्षे 330 दिवस, लाल बहादूर शास्त्रीने 1 वर्षे 216 दिवस, पुन्हां...

ब्राम्हण-बनिया जाती व सामंत शेतकरी जातींमधील शेतजमिनीवरील मालकीच्या सत्तासंघर्षाला तूर्तास स्थगिती!

इमेज
 ब्राम्हण-बनिया जाती व सामंत शेतकरी जातींमधील शेतजमिनीवरील मालकीच्या सत्तासंघर्षाला तूर्तास स्थगिती! शेतकरी परतीच्या मार्गावर तब्बल एक वर्षानंतर दिल्‍लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा शेवट गोड झाला. सरकारने संसदेत तीन कृषी कायदे मागे घेतले. या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि सरकार यांच्यातील संघर्ष पाहावयास मिळाला. एक वर्षभर चाललेल्या आंदोलनात सर्वसामान्य शेतकरी का सामील झाला नाही, याचे एक कोडेच होते. आजही आहे. या आंदोलनातील खरी गोम सर्वसामान्यांच्या लक्षात यावी, यासाठी डॉ. संग्राम मौर्य यांचे विचार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देणारे आहे, ते वाचकांसाठी देत आहोत. -संपादक आदर्शवाद समाजव्यवस्था बदलत नसतो. शासक व शोषित जातीमधील संघर्षाचे स्वरूप, शासक जात समूहाचे हितसंबंध, उत्पादन साधने (शेती, कारखाने ई.) व इतर आर्थिक संस्था यावरील शासक जातींची मालकी, शासक व शोषित उत्पादन संबंध व उत्पादन साधनांमध्ये होणारे क्रांतिकारक बदल, हे सर्व घटक व्यवस्था बदलासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जगभरात लोकशाही क्रांती होत असताना उगवत्या भांडवलदार वर्गाला कारखान्यासाठी कामगारांची गरज भासू लागली; परंत...

जातनिहाय जनगणनेचे भय कुणाला?

इमेज
 जातनिहाय जनगणनेचे भय कुणाला? ‘भारतातील वरच्या जाती ह्या इतिहासकाळापासून अनुदार आणि समाजविन्मुख राहिल्या. आधुनिक काळात ह्या जातींनी स्वत:ला मूल्यमापनासाठी सादर केले नाही. त्यामुळे उदारमतवादी आधुनिक भांडवलदारी व्यवस्थेचे किती लाभ वरच्या जातींना मिळाले यांचे मापन होऊ शकलेले नाही. दलित, आदिवासी, भटके-विमुक्‍त व मुस्लिम यांच्या मागासलेपणाची चर्चा आणि या मागासलेपणाचे मापन केले जाते. तथापि, वरच्या जातींकडे असलेल्या संसाधनांचे किंवा त्यांच्यात आर्थिक मागासलेपणाचे (ते असेल तर) त्या मागासलेपणाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. आजतरी हा वर्ग यासाठी तयार नाही’. देशात जातनिहाय जनगणना अथवा ओबीसी जनगणना हा विषय जनमानसात पोहोचलाय. सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे किंवा टाळत आहे. पाहायला गेले तर सर्वांचाच किंवा अर्ध्यापेक्षा जनतेचा आग्रह असेल तर सरकार ती का करत नाही, सरकारला काय अडचणी आहेत, याची कारणमीमांसा होण्यासाठी बहुजन शासकने या वर्षातील 45 वा अंक ‘ओबीसी जनगणना आणि आरक्षण’ या विषयावर विशेषांक काढण्याचे योजिले. भारतीय संविधान दिन (26 नोव्हेंबर) आणि राष्ट्रनिर्माते महात्मा जोतीराव फुले यां...

विश्‍वाचा निर्माता कोण? ; फुले म्हणाले, देव नाही!

इमेज
  विश्‍वाचा निर्माता कोण?  ; फुले म्हणाले, देव नाही! महात्मा फुले लिखित ‘निर्मिकाचा शोध’ व ‘मनुस्मृतीचा धिक्‍कार’ प्रकाशनाच्या वाटेवर भास्कर सरोदे, औरंगाबाद (गुरुवार, दि.9 डिसेंबर 2021) : विश्‍वाचा निर्माता कोण? संपूर्ण मानव जातीला पडलेला हा प्रश्‍न. आजचे प्रगत विज्ञानही त्याचे ठोस उत्तर देऊ शकले नाही. पूर्वग्रदूषितपणाने कदाचित. देव, निर्माता संकल्पना डोक्यात ठेवून विश्‍व निर्मितीचे गूढ उकलणार नाहीच. किंबहुना उकलू नये असेच गूढवाद तथा रहस्यवादींना वाटत असते. विज्ञानाच्या सर्व कसोट्या बायपास करून विश्‍वाचे गूढ उकलणार कसे? ज्यांना चिकित्सेचे वावडे आहे, ते गूढवादाच्या आडून आपला मतलब साधून घेतात. समाजक्रांतीकारक महात्मा जोतीराव फुले यांनी थोतांड माजविणार्‍यांचे तोंड फोडले आहे. महात्मा फुले म्हणाले, देव हा विश्‍वाचा निर्माता नाही. मग कोण आहे विश्‍वाचा निर्माता?  महात्मा फुले यांचा हा विज्ञानवादी पैलू आजपर्यंत दुर्लक्षित राहिला. महात्मा फुले यांनी ‘निर्मिकाचा शोध’ या छोट्या परंतु ऐतिहासिक, वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकातून विश्‍वाचा निर्माता कोण, याचे उत्तर दिले ...

जात नाकारली : जात्यांताच्या दिशेने एक पाऊल!

इमेज
जात नाकारली : जात्यांताच्या दिशेने एक पाऊल! महापरिनिर्वाण दिन अर्थात निर्धार दिन : येत्या जनगणनेत ‘ धर्म : बुद्ध , जात : नाही ,  वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’ करणार नोंद एक महिन्यापूर्वी मी माझा मुलगा जीवक (9 वी, नाथ व्हॅली स्कूल, औरंगाबाद) चा सीबीएसई बोर्डाचा अर्ज भरला. त्यात शेड्युल्ड कास्ट म्हणून मिळणार्‍या (अर्थात महार म्हणून) सर्व सवलती कुठल्याही संभ्रमनाविना नाकारल्या आहेत. कारण 1956 नंतर मी बुद्ध धम्मानुयायी आहे. माझ्या मुलाने बुद्ध धम्मीय म्हणून स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगावे, ही माझी इच्छा आहे. शिवाय बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या जातीसंस्था निर्मुलनाचा तो एक मूलगामी उपाय आहे. माझ्या टी.सी. वर काय आहे, हे आता गौण आहे; पण आज ठोस भूमिका घेणे महत्वाचे आहे, ती मी घेतली आहे. आगामी जनगणनेत जात, धर्माच्या रकान्यात काय लिहावयाचे याबाबत समाजात मोठा संभ्रम आहे. तो दूर होणे गरजेचे आहे. मी जनगणनेत ‘धर्म : बुद्ध, जात : नाही, वर्ग : धार्मिक अल्पसंख्याक’, अशीच नोंदणी करणार आहे.  कारण एक बुद्ध धम्मीय म्हणून मला जो मान, सन्मान, स्वाभिमान आणि दर्जा मिळाला तो महार म्हणून कधीच मि...